spot_img
ब्रेकिंगजून महिन्याच्या 'या' तारखेला मान्सूनची वर्दी! भारतीय हवामान खात्याची नवी अपडेट काय?...

जून महिन्याच्या ‘या’ तारखेला मान्सूनची वर्दी! भारतीय हवामान खात्याची नवी अपडेट काय? पहा..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
नैऋत्य मान्सून केरळमध्ये ३१ मे पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीने मुंबईत मान्सून १० ते ११ जूनपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी ज्या प्रमाणं मान्सून मुंबईत पोहोचतो त्यानुसार यंदा देखील त्याच दरम्यान यावेळी आगमन होऊ शकते.

भारतीय हवामान विभागाच्या वतीने शास्त्रज्ञांकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनानंतरच्या घडामोडींचा अभ्यास केला जाईल. तोपर्यंत अधिकृतरित्या मान्सूनच्या मुंबईतील आगमनाची निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही. १० जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून १९ मे २०२४ पर्यंत मालदीव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र येथे मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती दिलेली होती.

हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अंदाजानुसार जर मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असला तरी मुंबईत मान्सूनचे आगमन होण्यासाठी १० -११ जूनची वाट पाहावावी लागेल, असे म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे.

केरळमध्ये ३१ मे पर्यंत मान्सून पोहोचेल. त्यानंतर मुंबईत पोहोचण्यासाठी १० ते ११ जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. केरळमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईतील आगमनाची निश्चित तारीख जाहीर करु, असे देखील हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...