spot_img
ब्रेकिंगManoj Jaraje Patil: येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? जरांगे पाटलांनी घेतला मंत्री...

Manoj Jaraje Patil: येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? जरांगे पाटलांनी घेतला मंत्री भुजबळांचा समाचार

spot_img

जालना। नगर सहयाद्री 
येवल्यावाला म्हणतो की आम्ही ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो का. त्यानंतर म्हणतो एसटी भरलेली आहे. मी म्हटलं मला दार तर उघडू दे. त्या एसटीत तू एकटाच तंगड्या लांबून बसलाय तुला तंगडीसकट बाहेर ओढतो अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचा समाचार घेतला.

जरांगे पुढे म्हणाले, ४ जूनला सगळ्यांनी अंतरवली सराटीत यायचं आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. मराठा समाजाला आता करोडोंच्या संख्येत एक व्हायला हवे. मॅनेज होत नाही हे लक्षात आल्यानंतर सरकारकडून डाव रचला जात आहे. आता कोणत्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देता तेच बघू या, असा इशारा जरांगे पाटील यांनी या सभेतून दिला. छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जरांगेंनी जोरदार टीका केली.

तुझी नियत चांगली नाही. तुला तर फक्त खाण्याची सवय लागली आहे. ओबीसी महामंडळ ८० टक्के खाऊन टाकलं. त्याचाच सर्वात जास्त मराठा आरक्षणाला विरोध आहे. वंजारी आणि धनगर बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही तरीही तुम्ही त्यांना सभेला बोलावता, असा सवाल जरांगेंनी यावेळी उपस्थित केला. मला अटक करण्यासाठी सरकारने कट रचला. माझ्या विरुद्ध एसआयटी चौकशी समिती नेमली.

आता ते मला तुरुंगात टाकतील. माझ्या विरुद्ध रोज दोन किंवा तीन गुन्हे दाखल केले जातील. मला तडीपार करण्याचा त्यांचा उद्देश दिसतोय. तडीपार करून दुसर्‍या राज्यात गेलो तरी या राज्यातील मराठे त्या राज्यात बोलावून मोर्चे काढू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...