spot_img
अहमदनगरअण्णा हजारेंना रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले...

अण्णा हजारेंना रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष केले होते. त्यावर अण्णा हजारे यांनी १०-१२ वर्षांनी जाग आली असल्याचे सांगत माझ्यामुळे तुमचे काही मंत्री घरी गेले होते असे म्हटले होते. त्यावर आता यामध्ये उडी घेत अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.

स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब झाले, असं वक्तव्य करत रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी पुढे असेही म्हटले, २०१४ पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर मात्र एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना शांतच राहिले नाहीतर गायब झालेत. शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होते. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही.

त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते, कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलं होतं. रोहित पवार यांनी आता अण्णा हजारे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यावर राज्यभरात टिकेची झोंड उठली आहे. आता अण्णा हजारे काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...