spot_img
ब्रेकिंगकोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

कोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
‘अबकी पार 400 पार’चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघापैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं महायुतीने जाहीर केलं आहे, दुसरीकडे ‘अबकी पार भाजप तडीपार’चा नारा महाविकास आघाडीने दिला आहे.

अशा तापलेल्या वातावरणात मतदारराजाच्या मनात नेमकं काय? ते एका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हे मधून समोर आलं आहे. राज्यातील जनतेचा मूड काय? मतदार राजा नेमका विचार करतोय काय? याचा निष्कर्ष आता उजेडात आला आहे.

एका वृत्त वाहिनीच्या सी-व्होटर सर्वेच्या माहितीनुसार राज्याच्या मतदारांनी पंतप्रधानपदासाठी एकसष्ट टक्के पसंती नरेंद्र मोदी यांनाच दिली असून एकोणतीस टक्के मतदारांना पंतप्रधानपदी राहुल गांधी यांना निवडले आहे. तर सहा टक्के लोकांनी दोन्ही नेत्यांना ना पसंती दर्शवली असून उर्वरित चार टक्के लोकांनी उत्तरचं दिल नाही.

महाराष्ट्रा राज्यात एनडीएला एकेचाळीस टक्के तर इंडी आघाडीला एकेचाळीस टक्के मतं पडतील आणि इतर पक्षांना 18 टक्के मतं पडू शकतात. केंद्र सरकारच्या कामावर महाराष्ट्रातील 31 टक्के जनता खूप समाधानी आणि 30 टक्के जनता कमी समाधानी आहे. तर 35 टक्के जनता असमाधानी असल्याचे सी-व्होटर सर्वेच्या माध्यमातून समोर आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन पारनेर/प्रतिनिधी : पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या...

कामगाराने लावला मालकाला साडेपाच लाखाला चुना? घडलं असे काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगर- दौंड रस्त्यावरील हनुमान नगर समोर असलेल्या एस. आर. कन्स्ट्रक्शनच्या साईटवरून...

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला?; शरद पवार यांचे सूचक विधान..

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या अगोदर महायुतीने...

विधानसभेला महायुतीची वाढली डोकेदुखी; कारण काय?

पुणे | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाकडून बैठकांवर बैठका सुरू आहे....