spot_img
ब्रेकिंगBreaking : ठाकरे कुटुंबाला सरकारने घेरलं ! मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या...

Breaking : ठाकरे कुटुंबाला सरकारने घेरलं ! मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या कारभाराच्या चौकशीचे दिले आदेश

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : शिंदे सरकारने ठाकरे कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी पाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.

मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णयच शासनाने घेतला असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अडचण होईल असे म्हटले जात आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता तुमच्या कामांचे ऑडिट करेल असा हल्ला ठाकरे गटाने केलाय.

उदय सामंत यांनी दिली ‘ही’ माहिती
मुंबई महानगरपालिकेमधील कोव्हीड काळातील झालेला गैरव्यवहार समोर आला होता. तसेच इतर अनेक गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामंत म्हणाले. मुंबई मनपाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका काढणार आहे असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकांनी पुणे, ठाणे, नागपूर आणि इतर मनपाच्या चौकशीची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...