spot_img
अहमदनगरAhmednagar : नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर, दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Ahmednagar : नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर, दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील ज्या गावात गारपीटीमुळे नुकसान झाले आहे त्या गावातील जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था तातडीने करण्यात येईल. तसेच ज्या गावात अतीवृष्टी व गारपीट झाली त्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील अशी माहीती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील पानोली, वडूले व सांगवी सुर्या या गावातील अतीवृष्टी व गारपीटग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीची पहाणी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केली. त्या वेळी ते शेतक-यांशी बोलत होते. या वेळी त्यांच्या समावेत प्रातांधिकारी गणेश राठोड, तहसीलदार गायत्री सैंदाणे, भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे, सुप्याचे माजी सरपंच दत्तात्रेय पवार, नायब तहसीलदार गणेश आढारी, सुभाष कदम, तसेच संजय मते, बी.ए.भगत, लहू भालेकर, पंकज कारखिले आदींसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थीत होते.

या वेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेती पीके व फळबागांचे व कु्कुटपालनाचेही नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केली जातील.

थेट शेवटच्या शेतक-यापर्यंत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पंचनामे करण्यासाठी नेमलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनामे करताना कोणालाही वगळले जाणार नाही. तसेच अतीवृष्टीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थीत झाला आहे. त्यामुळे जनवरांसाठी तातडीने चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल असेही ते म्हणाले.

गारपीटग्रस्तांना तातडीने मदत द्यावी
पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी. तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे व आता रब्बीचीही पीके गारपीटीमुळे वाया गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने व जास्तीजास्त मदत मिळावी – राहुल शिंदे पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...