spot_img
ब्रेकिंगमहाआघाडी, महायुतीत जागा वाटपाचे घोडे अडले? महायुतीत ९ तर आघाडीमध्ये 'इतक्या' जागांवरून...

महाआघाडी, महायुतीत जागा वाटपाचे घोडे अडले? महायुतीत ९ तर आघाडीमध्ये ‘इतक्या’ जागांवरून खडाखडी

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री-
देशासहित राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीचे ९ जागांवरून जागावाटपाचे घोडे अडले आहे. त्यामुळे या रणधुमाळीत जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडीने महायुतीवर सरशी घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचे ३ उमेदवार घोषित करायचे बाकी आहेत. तर महायुतीचा ९ जागांचा तिढा कायम आहे. या जागांवरील दावे प्रतीदाव्यांमुुळे जागा वाटप रखडले आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता लोकांमध्ये वाढू लागली आहे. राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राता सभांचा धडाका लावला आहे. मात्र, महाविकास आघाडीचा ९ जागांचा गुंता कायम आहे.

महाविकास आघाडीने फक्त तीन उमेदवार घोषित करणे बाकी आहे. या तीन जागांवरील उमेदवारांपैकी दोन जागा काँग्रेसच्या तर एक जागा पवार गटाची आहे. या जागांमध्ये माढा, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिक्षेच्या यादीत आहे. दुसरीकडे महायुतीत ९ जागांवरील तिढा कायम आहे. कुठल्या जागा कोणी लढवायच्या, यावरून महायुतीत वाद असल्याचे समोर आले आहे.

महायुतीतील ९ मतदारसंघाच्या ९ मतदारसंघाच्या अजूनही चर्चा सुरु राहील. या ९ जागांमध्ये ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे कोणती जागा कोणाच्या पारड्यात पडते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...