spot_img
महाराष्ट्रउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ५० वकील मनोज जरांगे यांच्या भेटीला ! पहा...

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ५० वकील मनोज जरांगे यांच्या भेटीला ! पहा नेमके काय घडले

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभेबाबत अनेक सूचक वक्तव्ये केली आहेत. लोकसभेला मराठा उमेदवार उभे करण्याबाबत त्यांनी सूतोवाच केले होते.

आता लोकसभा निवडणुकीत राजकीय धडा गिरविण्याची संधी या आंदोलकांना आली आहे. समाजाने प्रत्येक लोकसभा मतदार संघात जास्तीत जास्त उमेदवार देण्याची मागणी होत आहे. उद्या 30 मार्च रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे याविषयीचा निर्णय जाहीर करतील. पण त्यापूर्वी मराठवाड्यातील वकिलांनी त्यांन सबुरीचा सल्ला दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी जरागे यांना केले. कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढण्यापासून या वकिलांनी जरांगे यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

अपक्ष उमेदवार उभे केल्यास, पक्षाशी युती करून निवडणूक लढल्यास आरक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहिल. आरक्षण आंदोलनाचे मोठे नुकसान होईल. या निर्णयामुळे समाज बांधवांमध्ये एक प्रकारची संभ्रमाची अवस्था निर्माण होऊन आरक्षण आंदोलनालाच यामुळे खीळ बसण्याची भीती वकिलांनी व्यक्त केली. अपक्ष उमेदवार उभे केल्यास मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये अधिक तीव्र ध्रुवीकरण होऊन समाजविघातक शक्ती त्याचा अधिक फायदा उचलतील, याकडेही वकिलांनी लक्ष वेधले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी: 20 दिवसांनी निवडणुका होणार?; महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Election:दर वीस दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती...

विळद घाटात मोठी कारवाई; काळा कारभार करणारे तिघे गजाआड..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने...

जुनी इच्छा पूर्ण होणार? कसा जाणार सर्वांचा दिवस?, वाचा आजचे भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

अजितदादांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस...