spot_img
अहमदनगरतलवारीच्या धाकावर लुटणारे ५ आरोपी जेरबंद, ५० हजार जप्त

तलवारीच्या धाकावर लुटणारे ५ आरोपी जेरबंद, ५० हजार जप्त

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : तलवारीच्या धाकावर लुटणारे पाच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ५० हजारांची रक्कम जप्त केली. सत्यवान दादा जाधव, गौरव महादेव नाळे,शुभम सुदाम क्षिरसागर (तिन्ही रा.अजनुज, ता.श्रीगोंदा), अरबाज बशीर सय्यद, सलीम शब्बीर बेग (दोन्ही रा.आनंदवाडी, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली.

अधिक माहिती अशी : ३० जानेवारी रोजी निलेश नामदेव जाधव (रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) हे साथीदारासह टेम्पो घेऊन चालले होते. यावेळी सहा इसमांनी तलवारीचा धाक दाखवत मारहाण करत १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत गुन्ह्याचा तपास करुन आरोपीना अटक करण्याचे सूचित केले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिनांक ६ फेब्रुवारीला पथक तयार करून याबाबत शोध घेत होते.

श्रीगोंदा परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वरील आरोपींनी हा गुन्हा केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अजनूज गावात सापळा लावून आरोपी ताब्यात घेतले. गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी ५० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...