spot_img
महाराष्ट्रहिवाळी अधिवेशनावर धडकणार 100 मोर्चे ! सरकारला घाम ?

हिवाळी अधिवेशनावर धडकणार 100 मोर्चे ! सरकारला घाम ?

spot_img

नगर सह्याद्री / नागपूर
उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु होईल. राज्यातील विविध प्रश्नांमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामधील 45 पेक्षा जास्त मोर्चांना परवानगी मिळाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी हे अधिवेशन गाजेल असे म्हटले जात आहे.

 अधिवेशनात असू शकतात ‘हे मुद्दे
उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्दे असतील. सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येऊ शकतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या नुकसानीची भरपाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षांची बैठक
अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. विरोधकांच्या बैठकीत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

100 मोर्चे विधिमंडळावर धडकणार
नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अधिवेशनावर जवळपास 100 मोर्चे धडकणार आहेत. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त मोर्च्यांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हिलंस व्हॅन तैनात असणार आहे. अधिवेशन काळात पोलीसांचं जेवण, निवास आणि आरोग्याची उत्तम व्यवस्था असेल, असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...