spot_img
आरोग्यऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात लोक जास्त आजारी का पडतात? 'हे' आहेत चार...

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात लोक जास्त आजारी का पडतात? ‘हे’ आहेत चार कारणे

spot_img

शरद ऋतूची सुरवात होताच पाने गळून पडू लागतात आणि हवा थंड होऊ लागते. अनेक जण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हंगामी आजारांशी लढताना दिसतात.

या महिन्यात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. या आजारी पडण्यामागे अनेकदा हवामान बदलाला जबाबदार धरले जाते. या महिन्यांत आजारी पडण्याचे अनेक कारणे आहेत. तापमानातील घट किंवा हवामान बदल हे एकमेव कारण नाही.

1. व्हिटॅमिन डी ची कमतरता
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दिवस लहान होतो. त्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश कमी पडतो, यामुळे व्हिटॅमिन डी चे शरीरातील उत्पादन कमी होते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचे असते. यामुळेच या काळात आपल्याला अधिक व्हायरल इन्फेक्शनला सामोरे जावे लागते.

2. लोक जास्त वेळ घरात राहतात
या दोन महिन्यांत लोक बाहेरच्या तुलनेत घरात जास्त वेळ घालवतात. कारण बाहेर थंड हवा असते. इतके लोक एकत्र संपर्कात आल्याने विषाणूचा प्रसार लवकर होतो.

3. डासांची उत्पत्ती होण्यास पोषक काळ
पावसानंतर हवामानात बदल होऊन अनेक ठिकाणी पाणी साचते, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया ला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती योग्य ठरते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत या डासांची संख्या खूप वाढते, त्यामुळे हा आजार पसरतो.

4. निष्काळजीपणा
या ऋतूमध्ये जास्त उष्णताही नसते किंवा जास्त थंडीही नसते. याच काळात लोक निष्काळजीपणा दाखवतात, जसे की पहाटे आणि रात्री उशिरा थंड कपडे न घालणे, कमी तापमानात आंघोळ करणे. अशा चुका अनेकांना महागात पडतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...