मुंबई । नगर सहयाद्री
राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु असून राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यात हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यांत आज यलो अलर्ट जारी केला आहे.
आजपासून म्हणजेच19 मे ते 25 मे दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रातजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’सुद्धा जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.