spot_img
अहमदनगरRain update:चिंता वाढवणारी बातमी!‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अर्लट

Rain update:चिंता वाढवणारी बातमी!‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अर्लट

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल पहायला मिळत आहे. अनके ठिकाणी रखरखत्या उन्हाचा पारा चढतांना दिसत आहे. तर काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकरी संकटात राबद्दल आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याची पुन्हा चिंता वाढवणारी माहिती समोर आली असून विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. तापमानाचा पार चाळीशीपार गेला असताना मराठवाडा आणि विदर्भात अधून मधून अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत.

या पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. याशिवाय शेतीपिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे विदर्भावर उंच उंच ढग तयार होत आहेत. त्यामुळे ढगातील तापमान शून्य अंशांच्या खाली जाऊन गारांची निर्मिती होत आहे. यामुळे येत्या २४ तासांत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होणार असून विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्याना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...