spot_img
अहमदनगरभाजपच्या नेत्याला अडकवणाऱ्या महिलेला अटक!, नेमकं प्रकरण काय?

भाजपच्या नेत्याला अडकवणाऱ्या महिलेला अटक!, नेमकं प्रकरण काय?

spot_img

Politics News: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून, आरोपी महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, सापळा रचून महिलेला १ कोटी रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित महिलेकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते. मात्र या आरोपांचे गांभीर्य आणि खरेपणा तपासण्यात असतानाच या प्रकरणातून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने थेट ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सातारा पोलिसांनी यासंबंधी माहिती मिळताच कारवाईची आखणी केली. पोलिसांनी सापळा रचून महिलेला १ कोटी रुपये घेताना अटक केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जयकुमार गोरे हे भाजपचे वरिष्ठ नेते असून सध्या राज्यात ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्यावर लागलेले आरोप आधीच चर्चेचा विषय ठरत होते. आता त्या आरोपांमागे खंडणीचा डाव असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी महिलेविरुद्ध ठोस पुरावे असून पुढील चौकशीदरम्यान आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन याप्रकरणी गंभीर असून कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; आणखी एक व्हिडिओ समोर, वाचा सविस्तर

संतोष देशमुखांच्या भावाला 20 कोटी रुपयांची ऑफर बीड । नगर सहयाद्री:- मराठा आंदोलक मनोज जरांगे...

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मान जनक जागा मिळाव्यात: मंत्री नरहरी झिरवाळ

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या...

नगर जिल्ह्याला भरली हुडहुडी; थंडी वाढणार की घटणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- थंडीला चांगलीच सुरुवात झाली असून, आता हुडहुडी भरू लागली आहे....

धोका वाढला! पारनेर तालुक्यात भीतीचे वातावरण; पालकमंत्री विखे पाटील यांची घेतली भेट, मागणी काय?

पारनेर/ नगर सहयाद्री:- तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर तातडीने उपाययोजना...