spot_img
ब्रेकिंगराज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार?; शरद पवार मोदी सरकारमद्ये जाणार...

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार?; शरद पवार मोदी सरकारमद्ये जाणार…

spot_img

Politics News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. प्रहार संघटनेचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू पंढरपूर दौऱ्यावर आहेत. तिथूनच त्यांनी एक मोठा दावा केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये केंद्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या अपयशाला समोरं जावं लागलं. विधानसभेला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच प्रहार संघटनेचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, ज्या पद्धतीने नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत. ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत आहे. त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये, हाच राऊत यांचा प्रयत्न आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...