spot_img
महाराष्ट्रघोड धरणाचा पाणी प्रश्न पेटणार…? साकळाई योजनेस विरोध वाढला

घोड धरणाचा पाणी प्रश्न पेटणार…? साकळाई योजनेस विरोध वाढला

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणाचा पाणी प्रश्न भविष्यात पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून या धरणातुन नगर तालुक्यातील गावांसाठी होणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिरुर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे. तसेच हि योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील चिंचणी गावात घोड धरण असून या धरणाचा पाणीसाठा सुमारे ७ टीएमसी आहे. या धरणाच्या पाण्यामुळे शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक गावे जलसिंचनाखाली आलेली आहेत. या धरणामधून दोन कालवे असून, एक श्रीगोंदा तालुक्यातील गावातील मूळ लाभार्थ्यांसाठी आहे, तर दुसरा शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, तसेच याच धरणामधून पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा होत आहे. तसेच अनेक पिण्याच्या पाणीपुरवठा योजना तसेच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपसा जलसिंचन योजना आहेत.

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस तीव्र विरोध सुरु केला असुन साकळाई जलसिंचन योजनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी, चिखली यासह इतर ३२ गावे ओलिताखाली आणण्याचा सरकारचा मानस आहे. या उपसा सिंचन योजनेसाठी १.८ टीएमसी म्हणजेच सुमारे २ टीएमसी पाणी लागणार आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखील योजनेचा हेतू सफल होण्याबद्दल शांशकता निर्माण होत आहे.

आधीच या धरणातून शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे सरकारने अशा पद्धतीचा नाहक खर्च करू नये. त्यापेक्षा कुकडी कालव्यातून विसापुर धरणात पाणी सोडून त्यातून सदर योजना राबविल्यास जास्त लाभदायक व कमी खर्चात यशस्वी योजना राबविता येईल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

….तर धरणग्रस्त शेतकरी आंदोलन करणार…?
उन्हाळ्यामध्ये घोड धरणातून होत असलेल्या कालव्यातील आवर्तनांना मुळात आत्ताच मोठ्या प्रमाणात अडचण येत असून, मे महिन्यात पिके अडचणीत येत असतात. अशातच आता नवीन साकळाई उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित झाल्यास या धरणावर अवलंबून असलेले शिरूर तालुक्यातील चिंचणी, शिंदोडी, निमोणे, गोलेगाव, तर्डोबाची वाडी येथील धरणग्रस्त शेतकरी यांनाही याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच या धरणाच्या दोन्ही कालव्यांवरचे मूळ लाभार्थी शेतकरी यांनाही पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.

शिरुर व श्रीगोंदा तालुक्यांतील मूळ लाभार्थी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा साकळाई जलसिंचन योजनेला विरोध असुन शासनाने ही योजना बळजबरीने लादल्यास शिरुर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करतील, याची दक्षता शासनाने घ्यावी, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...