spot_img
अहमदनगरतुतारी वाजणार का? फक्त हवा निघणार!! खासदार विखे पाटील यांनी सोडलं टीकास्त्र

तुतारी वाजणार का? फक्त हवा निघणार!! खासदार विखे पाटील यांनी सोडलं टीकास्त्र

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह दिले आहे. ही तुतारी वाजणार का? फक्त हवाच निघणार हे निवडणुकीत पाहू अशा शब्दात खासदार सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटावर टीकास्त्र सोडलं आहे.

राष्ट्रवादी मध्ये दोन गट पडल्यानंतर पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार यांना देण्यात आले. त्यानंतर शरद पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिल आहे. शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आणि तुतारीवाला माणूस हे चिन्ह शरद पवार गटाकडे असणार आहे.

खासदार विखे पाटील नेमकं म्हणाले काय?

जलजीवन मिशनमधील कामांचे टेंडर, ठेकेदार नियुक्ती व वर्कऑर्डरचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले आहे. त्यांनाच मलिदा गेला आहे. सत्तांतरानंतर त्यांचा हिशेब कोलमडल्याने ते तक्रारी करीत आहेत, काळातच या योजनेचा आराखडा मंजूर झाला होता. त्यावेळी त्यांनी नियुक्त केलेल्या ठेकेदारांबर आम्ही आक्षेप घेतले नाही. सत्तांतरानंतर आम्ही नवे ठेकेदार नेमू शकलो असतो. पण आमची ती नीतीमत्ता नाही. अशा शब्दात आ. प्राजक्त तनपुरे यांच्या आरोपांना खासदार विखे पाटील यांनी उत्तर दिले.

राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह दिले आहे. ही तुतारी वाजणार का? फक्त हवाच निघणार, हे निवडणुकीत पाहू, अनेक पक्ष असतात व त्यांना अनेक चिन्ह मिळत असतात, त्यावर अनेकदा हरकतीही दाखल होतात. यामुळे पवार यांच्या तुतारीबरही एखादी हरकत दाखल होऊ शकते. त्यामुळे एकदा सारे क्लिअर होऊ द्या, त्यानंतर तुतारीतून आवाज निघणार हे कळेलच अशा शब्दात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली
शरद पवार गटावर टीकास्त्र सोडलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...