spot_img
अहमदनगरमहाविकास आघाडीचा फुगा फुटणार? तुम्ही तारीख लिहून ठेवा! देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त...

महाविकास आघाडीचा फुगा फुटणार? तुम्ही तारीख लिहून ठेवा! देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

spot_img

पुणे । नगर सहयाद्री
येथे भाजपच्या महाअधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत पसरवलेल्या खोट्या नॅरेटिव्हचा विधानपरिषद निवडणुकीत फुगा फुटल्याचं सांगत, फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना तारीख ठेऊन ठेवण्याची सूचना दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “आता चातुर्मास सुरू होतो आहे, जो तपश्चर्येचा काळ असतो. आम्ही संपर्क, संवाद आणि तपश्चर्येचा उपयोग करणार आहोत. २०१३ मध्ये पुण्यात झालेल्या अधिवेशनानंतर २०१४ मध्ये आपलं सरकार आलं होतं. आता देखील या ठिकाणी घेतलेल्या अधिवेशनात आम्ही दाव्याने सांगतो, की आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल.

फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली असली तरी विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह तयार केला. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या खोट्या दाव्यांना खोडा घालायला सुरुवात केली आहे.खोटं फार काळ टिकत नाही. खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम केलंय. हे म्हणत होते की, महायुतीचे आमदार फुटणार अरे तुमचे २० कधी फुटले हे तुम्हाला कळले नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केलाय. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, तर शरद पवार चारवेळेस मुख्यमंत्री झाले, त्यांनी आरक्षण का नाही दिलं? असं म्हणत फडणवीसांनी थेट शरद पवारांनाच सवाल केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण ओबीसीत आरक्षण देण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले तुमचं समर्थन आहे का? असा सवाल फडणवीसांनी केलाय. तसंच त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका सोडण्याचं आवाहन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना केलंय. पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...