spot_img
अहमदनगर... लाडक्या बहिणींचा लाभ बंद करणार; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

… लाडक्या बहिणींचा लाभ बंद करणार; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

spot_img

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या बोगस लाडक्या बहि‍णींनी सरकारचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत. याचसोबत अनेक पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या मार्गाने घेतलेला लाभ बंद करणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेता आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. काल पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना २६ लाख महिलांनी योजनेचा गैरवापर करुन लाभ घेतला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, या प्रकरणात सरकारकडून चौकशी सुरु आहे. जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन छाननी करत आहे. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. त्यांच्यात कोणाला लाभ द्यायचा आणि कोणाला नाही हे कुटुंबप्रमुखाने ठरवायचे आहे. त्यानंतर पत्र लिहून द्यायचे आहे. यानंतर त्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी केल्यानंतरच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी केल्यानंतर त्यातून महिलांची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरु होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...