spot_img
अहमदनगरजयंत पाटील 'सगेसोयरे' घेऊन जाणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर आमदार तनपुरे मनातलं बोलले

जयंत पाटील ‘सगेसोयरे’ घेऊन जाणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर आमदार तनपुरे मनातलं बोलले

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
लोकसभेच्या पाशवभमीवर भाजप, काँग्रेससह राज्यातील विविध पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मनातलं बोलत भाजपाला टोला लगावला आहे.

चाभी तालुक्यातील मिरी-तिसगाव बैठीनंतर आमदार तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी जयंत पाटील ‘सगेसोयरे’ यांना घेऊन जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटील यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना केला.

आमदार तनपुरे म्हणाले, जयंत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केलं आहे. आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत, भाजप दावा करत आहे की निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू तर भाजपने सांगावे की त्याचे मूळ लोक आहेत हे त्यांनी सांगावं. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले किती लोक आहेत, हेही पहावं अस म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेचा हर या जलऐवजी केवळ प्रचार करण्याचा हेतू तूदिसत आहे. अनेक ठिकाणी जलजीवन योजनेचे चुकीचे सर्वेक्षण झालेले आहे. हे चुकीचे काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाका अथवा निलंबीत करा. जलजीवन योजना सौर उर्जेवर आधारित केली असती मोठा उपयोग झाला असता.

मात्र, सरकार याप्रश्नी संवेदनशील दिसत नाही. सरकार आपली उर्जा दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात खर्च करतांना दिसत असल्याचा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला. सरकार आपली उर्जा दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात खर्च करतांना दिसत असल्याचा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...