spot_img
राजकारणशरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? काय ठेवली होती अट?...

शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? काय ठेवली होती अट? अजित पवार यांचा गौप्यस्फोट

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर ते भाजपसोबत गेले. आता सध्या राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह दोन्हीही अजित पवार यांना देण्यात आले आहे. दरम्यान अजित पवार हे शरद पवार यांच्यावर अनेकदा टीका करताना दिसतात. आता त्यांनी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? राजीनामा देताना काय अट ठेवली होती? याबाबतचा मोठा गौप्यस्फोट केलाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. मी राजीनामा देतो. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा आम्ही ते मान्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी न सांगता राजीनामा दिला. पण चार दिवसात काय चक्र फिरली काय माहीत, त्यांनी राजीनामा मागे घेतला, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद आणि पक्षाचा ताबा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादांनी शरद पवार यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमातून टीका केली आहे.

असा प्रसंग यायला नको होता
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याचं आवाहन केलं. बुथ कमिटीची बैठक घ्या. ज्येष्ठांना काम करताना पाहिलं आहे. मला लहान वयातच काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मला कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. १९८७ मध्ये कामाला सुरुवात केली. तरुणांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. आम्ही प्रेम दिले, वरिष्ठांनी संधी दिली आणि पक्षाने पदे दिली. काम करता करता अनुभव येत गेला. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. अजितदादा म्हणाले की, अशी घटना घडायला नको होती पण ते घडले आहे असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...