spot_img
ब्रेकिंगमहाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? 'या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? ‘या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

spot_img

 

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची नेतेमंडळी अलर्ट मोडमध्ये पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महायुती- महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे.

दरम्यान महाविकास आघाडीत उमेदवार ठरवण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर या प्रश्नावर शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला.

यावेळी शरद पवार म्हणाले, योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे. जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे.

जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो ओरिजिनल इच्छुक आहे, त्याला काही विचारलं जाणार नाही. तर गावातील सामान्य लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

तसेच दूध संस्था, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊनच उमेदवार ठरवला जाणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपाची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करण्यास विलंब का? ; मनमानी पद्धतीने प्रभागांची तोडफोड करू देणार नाही

  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा इशारा अहिल्यानगर / नगर सह्याद्री- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश...

आरक्षण सोडतीने पारनेरचे राजकारण तापले; महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

निघोज जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात चुरशीची निवडणूक रंगण्याचे संकेत

आरक्षण जाहीर; निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात, दिवाळीमध्येच प्रचाराचा धडाका निघोज । नगर सहयाद्री:- निघोज जिल्हा...

मनपा निवडणूक मॅनेज करण्याकरिता हस्तक्षेप; ‘यांनी’ केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने ठाकरे शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे क्रार अहिल्यानगर | नगर...