spot_img
ब्रेकिंगपुढील चार दिवस 'अवकाळी'! कोणत्या भागात कधी पाऊस? हवामान विभागाने दिली 'अशी'...

पुढील चार दिवस ‘अवकाळी’! कोणत्या भागात कधी पाऊस? हवामान विभागाने दिली ‘अशी’ माहिती

spot_img

Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस असं वातावरण दिसून येतंय. अनेक शहरांमधील तापमान ४२ अंशापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असून ५ एप्रिलपासून राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान असून राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभगाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर ५ ते ८ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...