spot_img
अहमदनगरचाललंय काय? १५ ,२० काळ्या स्कॉर्पियो आल्या, ३०, ४० गुंड उतरले, बीडनंतर...

चाललंय काय? १५ ,२० काळ्या स्कॉर्पियो आल्या, ३०, ४० गुंड उतरले, बीडनंतर पुन्हा राज्यात संतापजनक घटना

spot_img

Maharashtra Crime News: बीड जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातून घडलेल्या खूनाच्या घटनेचा धक्का अजून ताजा असतानाच धाराशिव जिल्ह्यातही पवनचक्की ठेकेदारांचा दहशत माजवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पवनचक्की ठेकेदारांकडून तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगागावात रिन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीसाठी गावकऱ्यांनी परवानगी नाकारली होती. त्यावर ठेकेदारांनी १५-२० काळ्या स्कॉर्पियो गाड्यांमधून ४०-५० बाऊन्सर्स गावात पाठवून गावकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.

गावात बाऊन्सर्सनी अरेरावीच्या सुरात धमकावून दोन तास गुंडागिरी केली. मात्र, वारंवार संपर्क साधूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेर भाजपाचे स्थानिक पदाधिकारी विशाल रोचकारी यांच्या हस्तक्षेपाने हा प्रकार थांबवण्यात आला. गावकऱ्यांनी आरोप केला आहे की पवनचक्की ठेकेदार पोलिसांच्या मदतीने गावात दहशत निर्माण करून बळजबरीने पवनचक्क्या उभारत आहेत. यावर त्यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार केली आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

पवनचक्की ठेकेदाराच्या या दहशतीने गावकरी मात्र पूर्ण धास्तावलेले पाहायला मिळाले. या घटनेमुळे गावात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. ठेकेदार आणि बाऊन्सर्सच्या दहशतीने गावकरी घाबरले आहेत. प्रशासनाने या गुंडगिरीवर तत्काळ कारवाई करावी आणि दोषींवर कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. बीडनंतर धाराशिव जिल्ह्यातही अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....