spot_img
ब्रेकिंगजून महिन्याच्या 'या' तारखेला मान्सूनची वर्दी! भारतीय हवामान खात्याची नवी अपडेट काय?...

जून महिन्याच्या ‘या’ तारखेला मान्सूनची वर्दी! भारतीय हवामान खात्याची नवी अपडेट काय? पहा..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
नैऋत्य मान्सून केरळमध्ये ३१ मे पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीने मुंबईत मान्सून १० ते ११ जूनपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी ज्या प्रमाणं मान्सून मुंबईत पोहोचतो त्यानुसार यंदा देखील त्याच दरम्यान यावेळी आगमन होऊ शकते.

भारतीय हवामान विभागाच्या वतीने शास्त्रज्ञांकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनानंतरच्या घडामोडींचा अभ्यास केला जाईल. तोपर्यंत अधिकृतरित्या मान्सूनच्या मुंबईतील आगमनाची निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही. १० जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून १९ मे २०२४ पर्यंत मालदीव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र येथे मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती दिलेली होती.

हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अंदाजानुसार जर मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असला तरी मुंबईत मान्सूनचे आगमन होण्यासाठी १० -११ जूनची वाट पाहावावी लागेल, असे म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे.

केरळमध्ये ३१ मे पर्यंत मान्सून पोहोचेल. त्यानंतर मुंबईत पोहोचण्यासाठी १० ते ११ जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. केरळमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईतील आगमनाची निश्चित तारीख जाहीर करु, असे देखील हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान मोदी पोहचले थेट आदमपूर एयरबेसवर; जवानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला मोठा धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र...

साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत ‘डोनेशन पॉलिसी’; काय-काय सुविधा मिळणार?

शिर्डी । नगर सहयाद्री शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली...

पश्चिम देवस्थान समितीचा मोठा निर्णय; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ‘या’ ड्रेस कोडला बंदी

कोल्हापूर / नगर सह्याद्री : कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू...

निष्ठावंतांना पुन्हा मिळाली संधी! भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी दिलीप भालसिंग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदाची...