spot_img
अहमदनगरबाबांच्या शिर्डीत चाललंय काय? 'दादागिरी' करणार्‍यांचा एन्काऊंटर करा'; माजी खासदारांनी केली मोठी...

बाबांच्या शिर्डीत चाललंय काय? ‘दादागिरी’ करणार्‍यांचा एन्काऊंटर करा’; माजी खासदारांनी केली मोठी मागणी

spot_img

शिर्डी ।नगर सहयाद्री:-
शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी शहरात सध्या चाललय काय सध्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. दोन साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असताना साईबाबांची शिर्डी पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने चर्चेत आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी व दादागिरी करणार्‍यांचा थेट एन्काऊंटर करा व शिर्डी देवस्थानाच्या ठिकाणची दादागिरी, गुन्हेगारी कायमस्वरूपी मोडीत काढून दहशतमुक्त शिर्डी शहर निर्माण करा, अशी मागणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली.

शिर्डी शहरातील अवैध धंदे व दादागिरी कायमची मोडीत काढून दहशत मुक्त शिर्डी शहर निर्माण करण्याकरिता शासनाने गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीचे दादागिरी करणारे व अवैध धंद्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करुन शिर्डी शहर दहशतमुक्त करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो त्याचेवर कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे. दोष नसताना दोन संस्थान कर्मचार्‍यांची हत्या झाली आहे. दुहेरी हत्याकांडातील मयत दोन्ही संस्थान कर्मचार्‍यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. या दुहेरी हत्याकांडात मृत पावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांचे कुटुंबातील एका व्यक्तीस साईबाबा संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी सामावून घ्यावे, तसे आदेश शासनाने देवस्थानला करावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...