spot_img
अहमदनगरतीन मुलांसोबत घडलं 'ते' भयंकर! पाच मित्रांनीच रचला होता डाव? वाचा सविस्तर..

तीन मुलांसोबत घडलं ‘ते’ भयंकर! पाच मित्रांनीच रचला होता डाव? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-

जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डीजे ठरवायला गेलेल्या मित्रांना पाच जणांनी गाठून मागील भांडणाच्या कारणावरून लोखंडी गजाने मारहाण करत चॉपरने वार करून जखमी केले. याप्रकरणी पाच जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आकाश जाधव, रा.आंबेडकर वसाहत, दत्तनगर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३१ जुलैला रात्री मी आणि माझा मित्र कार्तिक केदारी, संकेत कदम असे आम्ही दत्तनगर येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डीजे ठरवायला गेलो होतो.

पायल डीजे यांच्या घरासमोर आम्ही तिघे उभे असताना तेथे रितेश, आकाश, अमित, साई, सयोग हे आले व मागीलभांडणाच्या रागातून शिवीगाळ, करू लागले. तेव्हा आपण मागील भांडण विसरलो असे त्यांना म्हणत असताना रितेश याने हातातील चॉपरने वार केला. तसेच साई याने लोखंडी रॉडने डोक्यात मारले तेव्हा खाली पडलो.

संकेत व कार्तिक हे मदतीला आले असता संकेत याच्या गालावर रितेश याने चॉपर मारला तसेच कार्तिक यास आकाश याने लोखंडी फायटरने डोक्यात मारले. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आकाश जाधव याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रितेश, आकाश, अमित, साई, सयोग यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...