spot_img
ब्रेकिंगपवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यासोबत घडलं ते धक्कादायक! 'बीड' मधून अपहरण तर 'नगर' मधून...

पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यासोबत घडलं ते धक्कादायक! ‘बीड’ मधून अपहरण तर ‘नगर’ मधून झाली सुटका

spot_img

बीड। नगर सहयाद्री-
2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी चक्क वनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केज- मांजरसुंबा मार्गावरील टोलनाक्याजवळून अपहरण करत नगर जिल्ह्यात नेत अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागीतल्याची घटना मंगळवारी घडली.

याप्रकरणी अवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केदू शिंदे (रा. टागोरनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीवरुन रमेश घुले व त्याच्या १० ते १२ साथीदारां विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: मॅनेजर सुनील शिंदे २८ मे रोजी सहकाऱ्यासोबत केजकडे येत होते. मांजरसुंबा रस्त्यावरील टोलनाक्याजवळ जीप (एम एच १५ ईबी २६८२) चालकाने इशारा करून त्यांना थांबवले. जीपमधील रमेश घुले याने, पवनचक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे आहे असे म्हणत पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्य मदतीने त्यांना बळजबरीने जीपमध्ये बसवत त्यांचे अपहरण केले.

त्यानंतर खरवंडी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे त्यांना नेण्यात आले. पवनचक्कीचे काम करायचे असेल तर २ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली. नगर जिल्ह्यातून सुटका झाल्यानंतर शिंदे यांनी मध्यरात्री १.२५ वाजता थेट केज पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘गाडी बाजूला घे’ म्हटल्याचा राग; एसटी बसचालकाला मारहाण, बसवर दगडफेकही

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील पुणेरोड बसस्थानकाजवळील स्वस्तिक चौकात ‘एसटी बस वळवण्यास अडथण होत आहे,...

दारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

लालटाकी येथे कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीलाही बेदम मारहाण अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील लालटाकी भागातील बारस्कर...

प्रस्तापितांचा विरोध पत्करला पण शिवाजीराव कर्डीले यांनी सर्वसामान्यांशी नाळ तुटू दिली नाही, आता अक्षय कर्डीले यांनी…

  आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व....

उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत....