spot_img
देशविमान अपघातावेळी नेमकं काय घडलं? नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितली महत्वपूर्ण अपडेट

विमान अपघातावेळी नेमकं काय घडलं? नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितली महत्वपूर्ण अपडेट

spot_img

Air India Plane Crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल २६५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालं होतं. मात्र, अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान एका वसतिगृहावर कोसळलं. ही घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

या विमान दुर्घटनेनंतर अनेक हृदय पिळवटून टाकणार्‍या कहाण्या समोर आल्या आहेत. मात्र, या घटनेबाबत अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. एअर इंडियाचं हे विमान उड्डाणानंतर काही वेळातचं कसं कोसळलं? त्यात काही तांत्रिक समस्या होत्या का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत.या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

विमान वाहतूक मंत्रालयाने काय म्हटलं?
नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा यांनी सांगितलं की, “१२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेलं एअर इंडियाचं विमान हे ६५० फूट उंचीवर गेलं होतं. मात्र, त्यानंतर ते विमान खाली आलं आणि अगदी एका मिनिटानंतर वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळलं. विमानाच्या पायलटने दुपारी १:३९ वाजता (१२ जून) एटीसीला मेडे कॉल केला होता. एटीसीनुसार जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अगदी एका मिनिटात रिप्लाय गेला होता पण तरीही प्रतिसाद मिळाला नाही. विमानतळापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळलं. तसेच १२ जून रोजी घडलेल्या अपघातापूर्वी याच विमानाने पॅरिस-दिल्ली-अहमदाबाद सेक्टर उड्डाण कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केलं होतं”, असं समीर कुमार सिन्हा यांनी म्हटलं.

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू काय म्हणाले?
“गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती अत्यंत कठीण होती. अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल माझ्या तीव्र संवेदना आहेत. या घटनेत ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत त्यांचं दुःख आणि वेदना मी समजू शकतो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या निर्देशानुसार एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्याचं निरीक्षण सुरू आहे. भारतातील ३४ ड्रीमलाइनर्सपैकी आठ विमानांची आधीच तपासणी झाली आहे”, असं मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

अपघातानंतरचं दृश्य काय होतं?
मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, “जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसलं की सर्व संबंधित विभागांचे पथके मदतीसाठी काम करत होते. शक्य तेवढा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. आग कमी करण्याचा आणि ढिगारा काढण्याचा प्रयत्न करत होते. जेणेकरून लवकरात लवकर हॉस्पिटलची मदत मिळेल. दरम्यान, विमानांशी संबंधित घटना आणि अपघातांची चौकशी करण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आलेला एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो सक्रिय करण्यात आलेला आहे”, असं मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...