spot_img
अहमदनगरकालच भेटलो, जेवलो… गप्पा मारल्या, अजूनही विश्वास बसत नाही; आमदार कर्डिलेंच्या निधनावर...

कालच भेटलो, जेवलो… गप्पा मारल्या, अजूनही विश्वास बसत नाही; आमदार कर्डिलेंच्या निधनावर सुजय विखेंची प्रतिक्रिया

spot_img

आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला ; डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. फक्त 66 व्या वष त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गुरुवारी आमदार कर्डिले हे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. एकत्र जेवण, संवाद आणि विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर काही तासांतच त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही वार्ता हृदय पिळवटून टाकणारी आहे. अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडली आहे. कालच आम्ही एकत्र होतो आणि आज ते आपल्यात नाहीत, हे स्वीकारणं कठीण आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, कर्डिले साहेबांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहेत. विखे आणि कर्डिले परिवार मागील अनेक दशकांपासून एकत्र राहिले आहेत. राजकीय क्षेत्रात आम्ही नेहमी खांद्याला खांदा लावून काम केलं. माझ्या दृष्टिकोनातून ते अहिल्यानगर जिल्ह्याचे एक राजकीय गुरु होते. त्यांच्या जाण्याने केवळ आम्हीच नव्हे तर संपूर्ण महायुती आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात सहकार, शेती, शिक्षण आणि पायाभूत विकास क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं. अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन, राज्यमंत्री आणि जनतेचे खरे हितचिंतक म्हणून त्यांनी लोकांशी थेट नाळ जोडली होती. साधेपणा, लोकाभिमुख कार्यशैली आणि प्रामाणिक सेवाभाव या गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व उठून दिसलं.

त्यांच्या जाण्याने केवळ एक जननेता हरपला नाही, तर जनसेवेची एक परंपराच खंडित झाली आहे. त्यांचे आदर्श आणि कार्यशैली हीच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांची वाटचाल पुढे नेणं हेच त्यांच्याप्रती खरं श्रद्धांजलीचं रूप ठरेल, असं डॉ. विखे पाटील म्हणाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास लाभो, अशा शब्दांत डॉ. विखे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

तळमळीने काम करणारा लोकसेवक हरपला: पवार
राहुरीचे आमदार शिवाजीराव कडले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार शिवाजीराव कडले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवत सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कडले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार शिवाजीराव कडले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कडले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कडले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार कडले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कडले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कडले यांच्या निधनाने कडले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कडले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची जिल्ह्यासाठी धक्कादायक बातमी: थोरात
आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधनाची बातमी जिल्ह्यासाठी धक्कायदायकच आहे. आमदार कर्डिले यांच्या जाण्याने विशेषतः मतदारसंघातील व अहिल्यानगर तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजीराव यांनी पाच वेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. ग्रामीण भागाचे नेतृत्व त्यांनी केले. ग्रामीण शहाणपण त्यांच्यामध्ये होते. अनेक भरीव अशी कामे त्यांनी केली. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारे नेते म्हणून ओळख
शिवाजीराव कर्डिले यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष सभागृहात काम केलं, जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती, त्यांना माझ्यातर्फे आणि पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो असे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. तर, कर्डिले यांच्या निधनाने मला धक्का बसला. ते एक पैलवान होते माझ्यासोबत मंत्री मंडळात होते. त्याचं असं अचानक जाण अनपेक्षित आहे. नियतीच्या मनात काय असतं सांगता येत नाही असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...