spot_img
ब्रेकिंगनिकालाच्या दिवशीच मुसळधार पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांना अलर्ट

निकालाच्या दिवशीच मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
एकीकडे लोकसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून जनतेच्या नजर निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहे तर दुसरीकडे बळीराजा पावसाच्या हजेरीची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच राज्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. पुण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तव्यात आली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आजपासून पुढील तीन ते चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं असून येत्या २४ तासांत मान्सून कोकणात आणि त्यानंतर पुण्यात दाखल होऊ शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...