मुंबई । नगर सहयाद्री: –
काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. आईने पोटच्या तीन मुलीसह गळपास घेत आयुष्याचा दोर कापल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. भिवंडीमधील फेणेगाव येथे महिलेने नवरा कामावर गेल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले.
नवरा रात्रपाळीच्या कामावर गेल्यानंतर महिलेने आपल्या तीन मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवले. १२, ७, ४ वर्षांच्या मुलीसह आईनेही गळफास घेत आयुष्याचा दोर कापला. कामावरून पती घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. समोर बायको अन् मुलीचे लटकलेले मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
रात्रपाळीनंतर बाप सकाळी नऊ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. भिवंडी जवळच्या फेणेगावत या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. काळजाचा थरकाप उडवणारी घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भिवंडी शहर पोलीस स्टेशनमधील पथक फेणेगावमध्ये दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तपास करण्यास सुरू झाला आहे. ही सामूहिक आत्महत्या का केली गेली? यामागील कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.