spot_img
अहमदनगरअहमदनगर: पाण्यासाठी पुढार्‍यांना गावबंदी! नगरच्या 'या' गावातील ग्रामस्थाचा मतदानावर बहिष्कार

अहमदनगर: पाण्यासाठी पुढार्‍यांना गावबंदी! नगरच्या ‘या’ गावातील ग्रामस्थाचा मतदानावर बहिष्कार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. प्रचारसभांनाही वेग आला आहे तर दुसरीकडे हक्काचे पाणी मिळण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी तर कोरेगव्हाणकरांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सन १९४८ रोजी तालुक्यातील विसापूर येथे ब्रिटिशकालीन तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावात निंबवी येथील सुमारे ९०० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. परंतु या गावातील प्रकल्पग्रस्तांना अद्यापि धरणग्रस्तचा दाखला मिळाला नाही. नेतेमंडळींकडून केवळ आश्वासने मिळाली.

दरम्यान, हे गाव विसापूर तलावाजवळ असूनही यांना हक्काच्या पाण्यासाठी सतत नेत्यांच्या मागे पळावे लागते. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी कोरेगव्हाणलाही नेत्यांकडून पोकळ आश्वासनेच मिळत आहेत. शेतीसाठी वेळेवर पाणी व वीज मिळवून देण्यात नेतेमंडळी अपयशी ठरली आहेत.

त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार तसेच शेतीसाठीही वेळेवर पाणी व मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत जळून जाताना पाहावी लागतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी गावात कोणत्याही राजकीय पक्षांचे बूथ लावायचे नाहीत. तसेच सर्व नेत्यांना गाव बंदी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणी टँकर्सची संख्या १९६ वर
उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबच जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिह्यात १९५ गावे आणि १ हजार १८ वाड्या वस्त्यांवरील चार लाख लोकांची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९६ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अजूनही बरीच गावे, वाडया-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे टँकरचा आकडा २०० पार जाण्याची शक्यता आहे. यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पार्‍यामुळे पाणीसाठयाचा जलस्तर झपाट्याने खाली जाऊ लागला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱया गावांची आणि वाड्यांची संख्या एप्रिलमध्येच लक्षणीय वाढली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...