spot_img
अहमदनगरविखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

spot_img

 

अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात
निघोज / नगर सह्याद्री :
सहकाराचे प्रतीक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेती, आरोग्य, शिक्षण, पाणी आदी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. पद्मश्रींच्याच पावलावर पाऊल ठेवत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी संपूर्ण हयातभर कार्य केले. ‘ ‘देह वेचावा कारणी’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी आपली सबंध जीवनयात्रा वर्णन केली आहे ती आपण प्रत्येकाने वाचावयास हवी. या राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेद्वारे अनेक स्पर्धकांनी त्यांच्यावर विविधांगी प्रकाश टाकला. विखे पाटील परिवार पद्मश्री व पद्मभूषण विखे पाटील यांच्या कार्याचा व वारकरी संप्रदायाच्या विचारांचा पाईक आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पद्मभूषण लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान अळकुटी व सहकारमहर्षी बाळासाहेब बाबर सार्वजनिक वाचनालय वडनेर बु.|| यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा सोमवार, दि. 13 जानेवारी 2025 रोजी अळकुटी महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सिताराम आण्णा खिलारी, ज्येष्ठ विश्वस्त अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अहिल्यानगर हे उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे यांनी आपल्या प्रास्ताविकाद्वारे महाविद्यालयाचा इतिहास व स्पर्धेची प्रासंगिकता कथन केली. पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर यांनी स्पर्धा सुरू करण्याबाबतची भूमिका व आवश्यकता कथन केली. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य भाऊसाहेब डेरे पाटील यांनी भविष्यकाळात बीबीए, बीसीए, बीसीएस आदी व्यावसायिक कोर्स महाविद्यालयात सुरू करावेत अशी मागणी याप्रसंगी केली.

या स्पर्धेत राज्यभरातून सत्तरहून अधिक स्पर्धकांनी यशस्वीरित्या सहभाग नोंदविला. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्र. कुमारी नवघणे विशाखा जालिंदर आय.बी.एम.ए. पायरेन्स कॉलेज, लोणी प्रवरा, द्वितीय क्र. कुमारी टाकळकर समृद्धी महेंद्र बी.जे. कॉलेज आळे, तृतीय क्र. कुमारी शेख मुस्कान मैनोदीन ए.सी.एस. कॉलेज अळकुटी, उत्तेजनार्थ कुमारी काळे श्रद्धा बापूसाहेब रा. नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर व गजरे सायली राजाराम ए.सी.एस. कॉलेज अळकुटी यांनी पटकविला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्र. कुमारी गिधाड संध्या विष्णू पी.व्ही.पी. कॉलेज प्रवरानगर, द्वितीय क्र. कुमारी पाडेकर दुर्गा राजेश सीताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालय बोरी बु., तृतीय क्र. कु. घाटपांडे साईराज मोहन श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे, उत्तेजनार्थ कुमारी कोल्हे उत्कर्षा बंडू श्री ओंकारनाथ मालपाणी महाविद्यालय संगमनेर व कु. वनारे अनिकेत रामा संताजी महाविद्यालय नागपूर यांनी पारितोषिके पटकाविली. याप्रसंगी प्रा.डॉ. शांताराम चौधरी व प्रा. दशरथ खेमनर यांनी उत्तमरित्या परीक्षकाचे कार्य पार पाडले. याप्रसंगी निघोज येथील स्वप्नील तनपुरे या युवा लेखकाने १०२ हून अधिक ग्रंथरचना निर्माण करत लौकिक संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल प्रवरा संस्थेच्या वतीने अळकुटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे व सहकारमहर्षी बाळासाहेब बाबर सार्वजनिक वाचनालय वडनेर बु. चे संस्थापक अध्यक्ष तथा सदस्य पं. समिती पारनेर दिनेशदादा बाबर यांचाही स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी पोपटराव गागरे, अशोक गुंजाळ, अशोक घोडके, खंडूजी म्हस्के, म्हस्के डॉक्टर, उमेश पुंडे, उपप्राचार्य प्रा. अमोल नालकर, प्रा. अर्जुन चाटे, प्रा. विशाल रोकडे, प्रा. संजय जाधव, प्रा. तांबे मॅडम, प्रा.दत्तात्रय शेळके, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा. शिवाजी शेळके, प्रा. मच्छिन्द्र बेलोटे, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. सचिन बलसाने, प्रा. सुप्रिया पारखे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. पूजा वैरागर, प्रा. पांडुरंग उघडे, डॉ. शांता थोरात, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. संदीप गेटम, प्रा. अनुराधा गाढवे, प्रा. मोहन माने, प्रा. राजाराम गोर्डे, कार्यालय अधीक्षक गोरख घोलप, लेखापाल सूर्यमाला भोर, सुनिता भालेराव, नितीन घोलप, विकास सोनवणे, छाया म्हस्के, राहुल बोरुडे, सागर शितोळे, मनोहर कनिंगध्वज, मच्छिन्द्र म्हस्कुले, वैजनाथ आवारी, रवींद्र वाघ, पांडुरंग शिरोळे, शिवाजी कळंबे आदी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. कुंदा कवडे, सूत्रसंचालन प्रा. स्वाती फापाळे व प्रा. विशाल रोकडे तर आभार प्रा.पूजा वैरागर यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....

शहर हादरलं! सरफिऱ्या पतीचे धक्कादायक कृत्य, चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळला..

Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...