spot_img
ब्रेकिंग'ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचले ४० वासरांचे प्राण'

‘ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचले ४० वासरांचे प्राण’

spot_img

निघोज । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील जवळे मार्गे शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जातीचे वासरे घेऊन जाणारा टेम्पो ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला. टेम्पो मधून गोवंशीय जातीच्या ४० वासरांची सुटका करण्यात आली. आक्रमक ग्रामस्थांना पहाताच टेम्पो चालकाने धूम ठोकली.

गुणोरे येथील दोघेजण दुचाकी वरून शिरूर कडे जात असताना जवळे येथील कुकडी वसाहत शेजारी सदर टेम्पोची दुचाकीस्वरांना धडक बसली. यावेळी टेम्पो चालक आणि दुचाकीस्वरांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली. यावेळी टेम्पोत कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने ४० गोवंशीय जातीचे वासरे आढळले.

ग्रामस्थांनी चालकाकडे चौकशी केली असता चालकाने धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोवंशीय जातीच्या ४० वासरांसह टेम्पो ताब्यात घेतला असून टेम्पो चालक विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. तसेच गोवंशीय जातीचे वासरे गो शाळेत देणार असल्याची त्यांनी सांगितले.

शाब्दिक चकमक
गुणोरे ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलीसांना दिली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद दाखल करावी अशी मागणी केली. परंतु पोलीसांनी ग्रामस्थांनी मागणी फेटाळली. यावेळी गणेश महाराज शिंदे यांनी हस्तक्षेप करीत फिर्यादी तुम्ही व्हा अडचण काय आहे? असा प्रश्न केला यावर ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...