spot_img
अहमदनगरवारी अधुरीच! भरधाव कंटेनरची दिंडीला धडक

वारी अधुरीच! भरधाव कंटेनरची दिंडीला धडक

spot_img

Pune-Nashik highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. भगवंताच्या नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे.  भीषण अपघात चार वारकर्‍यांचा मृत्यू झाला असून आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहे.

बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव), बबन पाटिलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (वय ५०, रा. कनकोरी, ता. राहाता), ताराबाई गंगाधर गमे (रा. कोर्हाळे, ता. राहाता) या चार वारकर्‍यांचा गंभीर मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तर बिजलाबाई अशोक शिरोळे (वय ६०, रा. वाकळी, ता. राहाता), राजेंद्र कारभारी सरोदे (वय ५०, रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (वय ५०, रा. वेस, ता. कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (वय १७, रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (वय ६०, रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापटे (वय १७, रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (वय ३५, रा. शिर्डी), मिराबाई मारुती ढमाले (वय ६०, रा. वावी, ता. सिन्नर) हे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर या दिंडीत भरधाव वेगाने जाणारा एमएच १२ व्हिटी १४५५ कंटेनर घुसल्याने हा भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारकर्‍यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली आहे. अपघातात वारकरी मृत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...