spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: 'धक्कादायक' प्रकरणाचा घराकडेच 'युटर्न'! बापच निघाला जन्मदात्या मुलाचा 'खुनी'

Ahmednagar Crime: ‘धक्कादायक’ प्रकरणाचा घराकडेच ‘युटर्न’! बापच निघाला जन्मदात्या मुलाचा ‘खुनी’

spot_img

अहमदनगर । नगर सह्यादी
शहरातील एका ‘धक्कादायक’ घटनेचा उलघडा झाल्याची बातमी समोर आली आहे. जन्मदात्या बापाने गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकून देत मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आल्याने बापाच्या कृत्याचे भाडं फुटलं.

अखेर पोलिसांनी बापासह मृताच्या भावाला अटक केली आहे. गणेश अशोक एकाडे (रा. बुरुडगाव, नगर) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी अशोक एकाडे व त्याच्या दुसऱ्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी: अशोक एकाडे यांनी मुलगा गणेश बेपत्ता असल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली होती.याप्रकरणी पोलिसांनी तपास देखील सुरु केला होता. परंतु, मुलगा गणेश मिळून आला नाही. पोलिसांना फिर्यादी अशोक एकाडे याच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी फिर्यादीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने आपणच मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तारीने बांधून दुसऱ्या मुलाच्या मदतीने विहिरीत ढकलून दिल्याची कबुली दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...