spot_img
ब्रेकिंगजिल्ह्याला अवकाळीचा तडाखा! वीज पडून अनर्थ, तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, कुठे घडली घटना?

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा! वीज पडून अनर्थ, तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, कुठे घडली घटना?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे अस्मानी संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. गत दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे.काल अकोले, पाथर्डी, शेवगाव, नेवाशाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. पाथर्डीत काही भागात गारपीट झाली. नेवासा तालुक्यात वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला.

नगरसह राज्याच्या विविध भागात गेल्या आठ दिवसांपासून भाग बदलत अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्याला आज मंगळवार (दि.13) रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दरम्यान, नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे काल दि 12 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यात आकाशात विजांचा कडकडाट ऐकू येत होता. त्याचवेळी शेतात काम सुरू असलेल्या तरुण शेतकरी गणेश शिवाजी काळे (वय 34) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

इमामपूर गावातील पोपट जानकीराम काळे यांच्या शेतात विद्युत रोहित्र (डीपी) आहे. ते विद्युत रोहित्र जळाले होते. पण काल ते दुरुस्त करून बसविण्यात आल्यानंतर त्या रोहित्रावरून विद्युत पुरवठा करणार्‍या नवीन विद्युत तारा कामगार व शेतकर्‍यांच्या मदतीने ओढण्याचे काम सुरू होते. पण सायंकाळी साडेसहा वाजता काम सुरू असताना त्या परिसरात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. त्यामध्ये गणेश शिवाजी काळे (वय 34) या शेतकर्‍याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...