spot_img
महाराष्ट्रमहाराष्ट्रात ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

महाराष्ट्रात ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असतानाच हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरूवारी राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला तर काही ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

रखरखत्या उन्हात राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झालेय. पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडू शकतो. शिवाय काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

कुठे कुठे अवकाळीचा इशारा –
पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस अवकाली पावसाचा इशारा देणयात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे.

मराठवाड्यात काय स्थिती ?
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाबळेश्वर धुक्यात हरवले –
राज्यभरात उष्णतेची लाट उसळली असताना महाबळेश्वर चक्क धुक्यात हरवल्याचे चित्र दिसू लागले आहे. एवढच नाही तर तापमानातही झपाट्याने घसरन झाल्याने सर्वांना हायसे वाटू लागले आहे. गेल्या तीन दिवसापासून सातारा जिल्ह्यातील तापमाने उच्चांग गाठला होता. गेल्या तीन दिवसापासून अक्षरशः 40 ते 43 °c इतक्या तापमानाची नोंद झाली. यात महाबळेश्वरातीलही तापमान 36 °c वर पोहचले होते. सायंकाळनंतर अचानकच हवामानात बदल होत गेला आणि चक्क संपूर्ण महाबळेश्वर परिसर धुक्यात हरवून गेल्याचे पाहायला मिळालं.या अशा वातावरणात धुक्याची चादर पसरल्यामुळे पर्यटकांमध्ये मात्र आनंदाचा वातावरण असल्याचे पाहायला मिळाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...