spot_img
अहमदनगरदुर्दैवी! अपघातात पती-पत्नीचा मृत्यू; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

दुर्दैवी! अपघातात पती-पत्नीचा मृत्यू; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी शिवारात कारचा अपघात होवून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सदर घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सचिन वसंतराव दरेकर (वय 57), रमा सचिन दरेकर (वय 53) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, की पुणे शहरातील गुरुवार पेठ-दरेकर वाडा येथील सचिन दरेकर, रमा दरेकर, सीमा सुरेंद्र देशमुख व सुरेंद्र देशमुख असे चौघे प्रजासत्ताक दिनी पहाटे साडेपाच वाजता कारमधून नाशिकला लग्नासाठी चालले होते. दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात आले असता अपघात झाला.

त्यानंतर त्यांना उपचारांसाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविले होते. मात्र, सचिन दरेकर व रमा दरेकर या दोघांना तपासून उपचारांपूर्वीच मयत असल्याचे घोषित केले. तर गंभीर जखमी सीमा देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोकॉ. प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, साईनाथ दिवटे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

या दुर्दैवी घटनेने दरेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मयत सचिन दरेकर यांचे भाऊ सतीष वसंतराव दरेकर यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे हे करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....