spot_img
अहमदनगरशिवराज राक्षेकडून पंचांना मारहाण, स्पर्धेत नेमकं घडलं काय?

शिवराज राक्षेकडून पंचांना मारहाण, स्पर्धेत नेमकं घडलं काय?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडचा शिवराज राक्षे याचा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने पराभव केल्यानंतर राक्षेने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांना लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर गोंधळ उडाला. “मी डबल महाराष्ट्र केसरी आहे, तिसऱ्यांदा होणार होतो, माझ्यावर अन्याय झाला,” असा आरोप राक्षेने केला आहे.

अहिल्यानगरीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढतहोती. यंदा महाराष्ट्र केसरी२०२५ चामानकरी कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थित होते.

नेमकं काय घडलं?
नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरू होता. सामन्यात राक्षेचा पराभव झाल्याचे जाहीर केल्यानंतर राक्षे संतापला आणि त्याने थेट पंचांनाच लाथ मारली. एवढेच नाही तर त्याने पंचांची कॉलरही पकडली होती. या प्रकारानंतर पोलिसांना हस्तक्षेप करत हे भांडण सोडवावे लागले. या प्रकारानंतर शिवराज राक्षेने कुस्तीचा रिव्ह्यू दाखवण्याची मागणी केली. “माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर मी स्वतःच कुस्ती सोडून बाहेर पडतो,” असे राक्षेने म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...