spot_img
ब्रेकिंगशिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना एक सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केलं होतं. कदाचित त्या दोघांमध्ये (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात) युतीबाबत फोन झालेही असतील असं भाष्य राऊत यांनी केलं होतं.

दरम्यान, त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील सूचक विधान करत तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे १०० पावलं पुढे येतील असं म्हटलं होतं. त्यानंतर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी मनसेशी युती करण्याच्या संदर्भात मोठं भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल’, असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे. साद दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “ठीक आहे, बघुया, जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“एक पाऊल पुढे या, राज ठाकरे १०० पावलं पुढे येतील”, ठाकरे गटाबरोबरच्या युतीसाठी मनसेने जाहीर केली भूमिका!
“तसेच मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं, याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. तसेच मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की संदेश वैगेरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?
“नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे. सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्याने त्याचा परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असेल. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपासून हे भाऊ आहेत”, असं संजय राऊत यांनी आज म्हटलं होतं. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी म्हटलं होतं की या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. त्यांना युती करायची असेल तर ते एकमेकांना फोन करतील. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, “या दोघांमध्ये फोन झालेही असतील. तुम्हाला फळ दिसल्याशी कारण आहे ना. युतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते”, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं.

उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर संदीप देशपांडे काय म्हणाले?
“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात २०१७ साली देखील काहीतरी होतं. त्याआधी २०१४ साली देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काहीतरी होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे? हे जास्त महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं त्या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणं योग्य नाही. आता ते काय बातमी देणार आहेत ते मला माहिती नाही. पण ते जर म्हणत असतील तर आपण सर्वजण बातमीची वाट पाहूयात”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे...

एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील; युतीसाठी मनसेची भूमिका जाहीर

मुंबई | नगर सह्याद्री राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळं...