spot_img
महाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय.. देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय.. देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकारानंतर अराजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उठला आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा घणाघात केला होता. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री भेटलेत असे ते म्हणाले होते. दरम्यान आता फडणवीस यांनीही मोठा घणाघात उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?
राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत, त्या बद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या काही घटना घडलेल्या आहेत, या व्यक्तीगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्याची गंभीरता मी नाकारत नाही. पण याचा कायदा-सुव्यवस्थेशी संबंध जोडणं चुकीच आहे.

दोन-तीन घटनांमध्ये त्यांची व्यक्तीगत भांडण, व्यवहार आहेत. आम्ही यामध्ये कठोर कारवाई करुच” सरकार गुंडांच्या मागे उभ राहिल्यास खून-खराबे वाढतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. “त्यांची भाषा आणि शब्द पाहिल्यानंतर माझ ठाम मत झालय, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी एवढच म्हणीन गेट वेल सून. मी त्याच्या वक्तव्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. ईश्वराकडे मी एवढीच प्रार्थना करीन, गेट वेल सून”.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...