spot_img
महाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय.. देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय.. देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकारानंतर अराजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उठला आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा घणाघात केला होता. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री भेटलेत असे ते म्हणाले होते. दरम्यान आता फडणवीस यांनीही मोठा घणाघात उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?
राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत, त्या बद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या काही घटना घडलेल्या आहेत, या व्यक्तीगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्याची गंभीरता मी नाकारत नाही. पण याचा कायदा-सुव्यवस्थेशी संबंध जोडणं चुकीच आहे.

दोन-तीन घटनांमध्ये त्यांची व्यक्तीगत भांडण, व्यवहार आहेत. आम्ही यामध्ये कठोर कारवाई करुच” सरकार गुंडांच्या मागे उभ राहिल्यास खून-खराबे वाढतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. “त्यांची भाषा आणि शब्द पाहिल्यानंतर माझ ठाम मत झालय, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी एवढच म्हणीन गेट वेल सून. मी त्याच्या वक्तव्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. ईश्वराकडे मी एवढीच प्रार्थना करीन, गेट वेल सून”.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...