spot_img
ब्रेकिंगबंडखोरांना उद्धव ठाकरेंचा झटका; घेतली अशी भूमिका...

बंडखोरांना उद्धव ठाकरेंचा झटका; घेतली अशी भूमिका…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ठाकरेंनी नेत्यांना सांगितले होते. पण अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ठाकरेंनी कठोर कारवाई करत पाच जणांना पक्षातून निलंबित केलेय.

तिकीट नाकारल्यामुळे आपल्याच पक्षाच्या विरोधात उतरलेल्या बंडखोरांवर ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे. अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे ठाकरेंनी कारवाई केली. भिवंडी पूर्वचे रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय अवारी आणि प्रसाद ठाकरे यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे.

मविआला बंडखोरांचा ताप, १४ ठिकाणी फटका –
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. १४ मतदारसंघात बंडखोर नेते विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षातील नेते मैदानात उतरलेत. ठाकरेंनी बंडखोरी मागे घेण्यास आपल्या नेत्यांना सांगितले. पण बंडोबा आपल्या निर्णायावर कायम राहिले, त्यामुळे ठाकरेंनी निलंबनाची कारवाई केली. उद्धव ठाकरेंनी पाच जणांना निलंबित केले.

कसबा पेठमधील मुखतार शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून मविआचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिलाय. काँग्रेसने सात नाराजांचे बंड शमवले आहेत. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. नाशिक मध्य हेमलता पाटील, भायखळा मधु चव्हाण, नंदूरबर विश्वनाथ वाळवी यांनी उमेदवारी मागे घेतली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...