spot_img
ब्रेकिंगपुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस; 'या' भागात ऑरेंज अलर्ट

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला आहे. जूनमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर चिंता वाढली होती. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी वरुणराजा रुसला की काय अशी परिस्थिती होती. पण, जुलै महिना सुरु होताच पावसाने राज्यात जोरदार एन्ट्री केली आणि सारेच सुखावले. जुलै महिन्याच्या १ तारखेपासूनच मान्सूनने राज्यात जोर धरला असून या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊन जून महिन्याची कसर भरुन निघणार आहे. मान्सूनने अखेर राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्य मान्सूनने गेल्या काही दिवसात व्यापलं आहे. जुलै महिन्याच्या पहिले चार दिवस मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस झाला. तर आता पुढील पाच दिवसही राज्यात जोरदार पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे.मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. तर, येत्या काही तासात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शयता आहे. तर, पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागांना पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई-ठाणे, पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शयता आहे. पुणे, कोल्हापूरमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, विदर्भातही पावसाची शयता आहे. येथील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भाग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसेल.

सिंधुदुर्ग, कोल्हापूरात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस (५ ते १० जुलै) हे पावसाचे असेल. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातार्‍याला पावासाच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, पालघरसह कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...