spot_img
अहमदनगरअर्बन बँक प्रकरणात ट्विस्ट !! पुन्हा एक भाडं फुटलं? भल्या पहाटे 'या'...

अर्बन बँक प्रकरणात ट्विस्ट !! पुन्हा एक भाडं फुटलं? भल्या पहाटे ‘या’ संचालकाला बेड्या

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी पहाटे एव्हीआय इंजिनिअरींग कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. कर्ज रकमेचा गैरवापर करून दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडले. यासह दुसऱ्या कर्जदाराच्या खात्यातून त्याच्या खात्यात काही रक्कम वर्ग झाल्याचेही समोर आले आहे.

बँकेत २९१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. फॉरेन्सिक ऑडिटनुसार स्पष्ट झालेल्या गैरव्यवहाराची तपासणी करून कारवाई केली जात आहे

एव्हीआय इंजिनिअरींग वर्क्सच्या संचालकाने दोन कोटी ६७ लाख रुपये कर्ज घेतले. यातील काही रक्कम दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी, काही रक्कम स्वतःच्या नावे मुदतठेव मध्ये गुंतवणुकीसाठी, वैयक्तिक खरेदीसाठी कर्ज रकमेचा गैरवापर केला. तसेच, एव्हीआय इंजिनिअरींग वर्क्सच्या बँक खात्यावर कर्जदार संशयित आरोपी व्यंकटेश डेव्हल्पर्स यांच्या नावाने मंजूर कर्ज रकमेतून ६९ लाख ६० हजार रूपये वर्ग झाले आहेत.

ही रक्कम बँकेच्या एचओबीआयटी खात्यावरून बँकेचे कर्जदार पन्नालाल बगाडीया यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये वर्ग झालेल्या रक्कमेतून परत केल्याचे चेकव्दारे दाखवण्यात आले आहे. याप्रकरणी संचालक अविनाश प्रभाकर वैकर (रा.रासने नगर सावेडी अहमदनगर) याला अटक केली असून न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....