spot_img
अहमदनगरअनाथाश्रमात गडबड! ५ मुली मध्यरात्री 'अशा' पळाल्या..

अनाथाश्रमात गडबड! ५ मुली मध्यरात्री ‘अशा’ पळाल्या..

spot_img

Maharashtra News: एका अनाथाश्रमातून ५ मुली पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचही मुली अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या पाचही मुलींचा शोध घेत आहेत.

२७ मार्चला नेहमीप्रमाणे दिनचर्या पूर्ण करून साडेअकरा वाजता सर्व झोपले होते. त्यानंतर २८ मार्चच्या मध्यरात्री ५ मुली एकापाठोपाठ वॉशरूमला गेल्या. बराच वेळ त्या परत आल्या नाही म्हणून नाईट वॉचमनने, सिस्टर म्हणून काम करणाऱ्या महिलेने बाथरूम तपासले. तर बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून या मुली पळून गेल्याचे दिसून आले.

अनाथाश्रमातील सिस्टर, वॉचमन या सर्वांनी सगळीकडे शोधाशोध केली पण या मुली कुठेच सापडल्या नाही. पाचही मुली १५ ते १७ वयोगटातील आहे. मुंबईच्या अंधेरी परीसरातील वीरा देसाई रोडवर असलेल्या सेंट कॅथरीन अनाथाश्रमामध्ये सदरची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुलींचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मिशिदीत स्फोट; महाराष्ट्रात भयंकर प्रकार..

Maharashtra Crime News: मशीद स्फोटप्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विजय गव्हाणे आणि...

शिर्डी विमानतळावर होणार नाईट लॅण्डिंग!

हैदराबादहून आलेल्या प्रवाशांचे प्राधिकरणाच्यावतीने प्रवाशांचे स्वागत शिर्डी | नगर सह्याद्री राज्यात कमी कालावधीत सर्वाधिक वेगवान ठरलेल्या...

‘अहिल्यानगरमध्ये रमजान ईद उत्साहात’

हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केली सामुदायिक नमाज अदा; एकात्मता व शांततेसाठी प्रार्थना अहिल्यानगर ।...

शासनाकडे ‘ती’ सेवा बळकट करण्यासाठी पाठपुरावा करणार;आमदार जगताप यांची मोठी माहिती

शीघ्र प्रतिसाद वाहनाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकार्पण अहिल्यानगर...