spot_img
अहमदनगरअनाथाश्रमात गडबड! ५ मुली मध्यरात्री 'अशा' पळाल्या..

अनाथाश्रमात गडबड! ५ मुली मध्यरात्री ‘अशा’ पळाल्या..

spot_img

Maharashtra News: एका अनाथाश्रमातून ५ मुली पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचही मुली अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या पाचही मुलींचा शोध घेत आहेत.

२७ मार्चला नेहमीप्रमाणे दिनचर्या पूर्ण करून साडेअकरा वाजता सर्व झोपले होते. त्यानंतर २८ मार्चच्या मध्यरात्री ५ मुली एकापाठोपाठ वॉशरूमला गेल्या. बराच वेळ त्या परत आल्या नाही म्हणून नाईट वॉचमनने, सिस्टर म्हणून काम करणाऱ्या महिलेने बाथरूम तपासले. तर बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून या मुली पळून गेल्याचे दिसून आले.

अनाथाश्रमातील सिस्टर, वॉचमन या सर्वांनी सगळीकडे शोधाशोध केली पण या मुली कुठेच सापडल्या नाही. पाचही मुली १५ ते १७ वयोगटातील आहे. मुंबईच्या अंधेरी परीसरातील वीरा देसाई रोडवर असलेल्या सेंट कॅथरीन अनाथाश्रमामध्ये सदरची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुलींचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...