spot_img
अहमदनगरपर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी जेरबंद; नगरमध्ये 'या' ठिकाणी घडली होती घटना

पर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी जेरबंद; नगरमध्ये ‘या’ ठिकाणी घडली होती घटना

spot_img

विळद परिसरात घडली होती घटना | स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर | नगर सह्याद्री

विळद परिसरत पर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने जेरबंद केली आहे. या कारवाईत पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही कारवाई केली आहे.

सुरेश रणजीत निकम, विलास संजय बर्डे, रोहित संदीप शिंदे, ज्ञानेश्वर भानुदास बर्डे, शांताराम भानुदास काळकुंड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ३ ऑगस्ट, २०२४ रोजी वैभव उत्तम सहजराव विळद परिसरातील गवळीवाडा वॉटर फॉल नगर येथे फिरण्यास गेले होेते. त्यावेळी अनोळखी ५ इसमांनी फिर्यादीस लाथाबुया व काठीने मारहाण करुन ६,९०० रुपये किंमतीचा मोबाईल फोन, चांदीची चैन, अंगठी व रोख रक्कम चोरून नेली होती.

या संदर्भात पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे राहुरी परिसरातील कात्रड परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईची माहिती पोलिस निरीक्षक आहेर यांनी दिली. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनीही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...