spot_img
ब्रेकिंगराज्यात तुफान पाऊस! 'या' जिल्ह्यात रिपरीप वाढणार? हवामान खात्याचा ऑरेंज आणि येलो...

राज्यात तुफान पाऊस! ‘या’ जिल्ह्यात रिपरीप वाढणार? हवामान खात्याचा ऑरेंज आणि येलो अलर्ट..

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री
राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने जोर धरला असून, पुढील २४ तासांतही जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक असून, नदी-नाल्यांना पूर येत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टीसह सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत गेल्या काही तासांत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. पुणे शहरातच मागील दोन महिन्यांत तब्बल ५११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ही आकडेवारी शहराच्या वार्षिक सरासरीच्या ७०–८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. नागपूर आणि परिसरात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला होता, तर गुरुवारी संध्याकाळपासून पुन्हा रिपरिप सुरू झाली आहे. नागपूरसह भंडारा जिल्ह्यालाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर ठरलं! ठाकरे बंधू एकत्र येणार?; संजय राऊतांची मोठी घोषणा

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. याच...

खळबळजक! नगरमध्ये आढळले ‘बांगलादेशी घुसखोर’; पोलिसांची मोठी कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि सैन्य कमांड मिलिट्री इंटेलिजन्स...

महत्त्वाची बातमी! या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जूनचा हप्ता; तुमचं नाव आहे का?

Ladki Bahin Yojana: लाखो महिलांसाठी दिलासा देणारी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेत आहे....

ढगाळ हवामानामुळे खरीप पिकांवर ‘संकटाची छाया’; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सतत ढगाळ हवामानामुळे...