spot_img
महाराष्ट्रवारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील वारकरी मल्हारी बाजीराव पवार यांच्या मोटारसायकलला एका अनोळखी ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात मल्हारी पवार (वय 57) व पंखाबाई मल्हारी पवार (54) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेने येळपणे गावावर शोककळा पसरली आहे.

पंखाबाई पवार या येळपणे येथील खंडेश्वर महाराज दिंडीत पायी गेल्या होत्या. आपल्या पत्नीला आणण्यासाठी मल्हारी पवार हे मोटारसायकलवरून शनिवारी पंढरपूरला गेले होते. शनिवारी संध्याकाळी पंढरपूर येथील पांडुरंग मंदिराच्या कळसाचे दोघांनी दर्शन घेतले. घराकडे परतण्यासाठी दोघे मोटारसायकलवरून रविवारी सकाळी निघाले. सोलापूर-पुणे रोडने येत असताना भिगवणजवळ एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली.

मल्हारी पवार जागीच ठार झाले, तर पंखाबाई पवार यांना भिगवण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यापूवच त्यांचे निधन झाले. या घटनेचे वृत्त समजताच सैनिक संघटनेचे नवनाथ खामकर व त्यांचे सहकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. तेथे त्यांनी मदतकार्य केले. रविवारी संध्याकाळी दोघांवर शोकाकुल वातावरणात येळपणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मयत दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...